शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नरसिंहगावच्या बारशामध्ये दिसला ऐक्याचा पाळणा! : संजयकाका-घोरपडे एकत्र येणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 23:27 IST

कवठेमहांकाळ तालुक्यात रंगली चर्चा कवठेमहांकाळ तालुक्यात रंगली चर्चा कवठेमहांकाळ तालुक्यात रंगली चर्चा तालुक्यातील लांडगेवाडी गावाचे नाव बदलून ‘नरसिंहगाव’ असे करण्यात आले.

ठळक मुद्देकवठेमहांकाळ तालुक्यात रंगली चर्चा

अर्जुन कर्पे ।कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यात रंगली चर्चा कवठेमहांकाळ तालुक्यात रंगली चर्चा कवठेमहांकाळ तालुक्यात रंगली चर्चा तालुक्यातील लांडगेवाडी गावाचे नाव बदलून ‘नरसिंहगाव’ असे करण्यात आले. हा सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. या सोहळ्यात भाजपचे खासदार संजयकाका पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे (सरकार) यांच्या कार्यकर्त्यांनी दोघा नेत्यांची गट्टी जमवण्याचा प्रयत्न केला असून, कार्यक्रमात दोघांच्या ऐक्याचा पाळणा हलल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.

मिरज-पंढरपूर राज्य मार्गावर नरसिंहगाव वसले आहे. साधारण ४६० कुटुंबे आणि २१२५ एवढी लोकसंख्या असलेले हे गाव. १९८६ पासून लांडगेवाडी हे नाव बदलण्यासाठी येथील सर्वच लोक धडपडत होते. अखेर या लढ्याला यावर्षी यश आले आणि गावचे बारसे घालण्याचा कार्यक्रम ठरला. या कार्यक्रमात गावकऱ्यांनी राजकारण न आणता सर्वच नेत्यांना निमंत्रण दिले. भाजपचे खासदार पाटील, राष्टवादीच्या आमदार सुमनताई पाटील, खासदार गटापासून दुरावलेले अजितराव घोरपडे, राष्ट्रवादीच्या नेत्या व महांकाली साखर कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे ही सगळीच मंडळी येणार म्हटल्यावर तालुक्यात चर्चेला उधाण आले.

नरसिंहगावच्या गावकºयांनी या गावच्या बारशाच्या सोहळ्याला सर्व माहेरवाशिणी, पै-पाहुणे, आप्तेष्ट, मित्रमंडळींना आवर्जून बोलावले होते. गावात सर्व मार्गांवर रांगोळी रेखाटली होती, गुढ्या उभारल्या होत्या. विद्युतरोषणाई करण्यात आली होती. कारण आजवरचे ‘वाडीकर’ आता ‘गावकरी’ होणार होते. याचा आनंद सर्वांच्याच चेहºयावर ओसंडून वाहत होता. सोहळा सुरू झाला.

सुरुवातीला घोरपडे यांचे आगमन झाले. ग्रामस्थांनी त्यांचे फटाके फोडून, वाजत-गाजत जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर अवघ्या १५ मिनिटात खा. संजयकाका पाटील कार्यक्रमस्थळी दाखल झाले. आ. सुमनताई पाटील, मात्र तालुक्यात चर्चेला उधाण नको म्हणून दुपारीच गावात येऊन गावकºयांची भेट घेऊन गेल्या.

सोहळा सुरू झाला, खा. पाटील, घोरपडे यांचा सत्कार झाला. दोघांनीही नरसिंहगावच्या नामकरण कोनशिलेचे अनावरण केले. दोघांच्याहस्ते गावातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खा. पाटील हे घोरपडे यांना, ‘सरकार, या पुढे, घ्या, करा सत्कार’, असे म्हणत होते. गावचे उपसरपंच अरुण भोसले, प्रशांत कदम, बाळासाहेब कदम, एल. पी. कदम यांनी या दोघांनी भविष्यात एकत्र यावे, यासाठी भाषणातून जणू राजकीय मनोमीलनाचा पाळणाच म्हटला. हे सर्व घडताना अनिता सगरे साक्षीला होत्या.

अखेर कार्यक्रम पार पडला. गावात चूल बंद करण्यात आली होती. बारशाच्या जेवणाचा गावकरी, पाहुणे मंडळींसह सर्वांनीच आस्वाद घेतला. नरसिंहगावच्या बारशाच्या कार्यक्रमानिमित्त खा. पाटील आणि घोरपडे चार वर्षांनी एकाच व्यासपीठावर आले होते आणि एवढ्या दिवसांचा अबोला या आनंद सोहळ्यावेळी सुटल्याचे चित्र होते. दोघांच्या जवळीकतेने तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.मनोमीलनाकडे लक्षनरसिंहगावच्या बारशाने अजितराव घोरपडे व खा. संजयकाका पाटील यांच्या एकीची चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांत या दोघांचे राजकीय मनोमीलन झाले, तर नवल वाटायला नको. राजकारणात सगळे काही माफ असते, असे आता लोक म्हणत आहेत.‘राजकीय बाळ’ रडू लागले!अलीकडे खा. संजयकाका पाटील आणि अजितराव घोरपडे-सरकार या दोघांमधून विस्तवही जात नव्हता. या सोहळ्याने मात्र तालुक्यातील राजकारणात उलटापालट होणार की काय, अशी चर्चा आता रंगली आहे. सोहळा पार पडला, नरसिंहगाव नामकरणही झाले, दोघांच्या राजकीय एकीचा पाळणाही हलला, पण या पाळण्यात भविष्यातील लोकसभा आणि विधानसभेचे ‘राजकीय बाळ’ रडू लागले आहे, अशी खुमासदार चर्चा सुरू आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण